Friday, June 24, 2011

नामंजूर ....!!

या लेखाला हे वेगळंच शीर्षक देण्याचं कारण हेच कि , माणसांच्या विचारांची अभिव्यक्ती/ठेवण उलगडून सांगणे.
आपल्या संस्कृतीने आपल्याला हेच शिकवलं कि, स्वतःचं हित-अहित जाणून स्वतःच्या उद्धाराबरोबरच स्वकोषातून बाहेर पडून समष्टीचा विचार करा आणि स्वक्षमतेचा  वापर समष्टी उद्धारासाठीसुद्धा करा. आजकाल माणसं ही संस्कृती विसरू लागल्येत कि काय असा वाटतं.  प्रत्येकजण "स्व" मध्ये एवढा गुंतलेला आहे कि त्याला आपला शेजारी आजारी आहे याचीदेखील कल्पना नसते. माणसाचं माणसाशी असलेलं नातं जिवंत न राहणं ही समाजासाठी फार घटक गोष्ट ठरेल. 
  आजकाल बाहेर वावरताना असंही दिसून येतं कि, माणसांना बाह्य आकार्षानांचा फार वेड आहे. मग अगदी स्वतःच्या मुलांना pubs, Discos मध्ये पाठवणं असेल, बड्या बड्या उपाहारगृहांमध्ये जाण्यासाठी पैसे देणं असेल..अशा अनेक गोष्टी!!!! केवळ STATUS चा भाग म्हणून आजकाल पालकसुद्धा या दुष्टचक्रात अडकलेले आहेत. रस्त्यावरून फिरताना अनेक Cafes, Junk food stalls उभे राहिलेले दिसतात जिथे आरोग्यासाठी पोषक नसणाऱ्या पदार्थांची विक्री होत असते. सगळी तरुण आणि लहान पिढी तिथेच घुटमळत असते, याचं कारण घरातून पालकांकडून सर्रासपणे पैसे मिळतात आणि त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे याचे दुष्परिणाम घराघरातून सांगितलेही जात नाहीत. 
   आता समस्त समाजाने या सर्व पाश्चात्त्य संस्कृतीला "नामंजूर!" असं खडसावून  सांगण्याची गरज आहे. 
आपल्या संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे माणसाच्या जीवनपद्धतीचे परिणाम त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर होत असतात, एवढी आपली भारतीय संस्कृती या बाबतीत प्रगल्भ आहे. प्रत्येक माणूस काय खातो,पितो, कसे कपडे घालतो, कोणत्या देवतेच पूजन करतो/त्या देवतेला मानतो या सर्व गोष्टी व्यक्तिमत्वाच्या उभारणीतील महत्वाचे पैलू असतात. 
आजकाल बोकाळलेल्या या सर्व तर्हेच्या पश्चात्त्यीकारणात भारतीय तरुण पिढी ज्या प्रगल्भतेची असायला हवी तितकी दिसत नाही, याच कारण हेच कि, येणाऱ्या बाह्य आकार्शानांकडे धाव घेण्याची मनोवृत्ती आणि पालकांचा मिळणारा दुजोरा अथवा मुले आणि पालक यांमधील सुसंवादाचा अभाव! 
  स्वामी विवेकानंदानी म्हंटल्याप्रमाणे , "भारत देश हा तरुणांचा देश असून, तरुणाईच्या कर्तृत्वावरच या देशाची ओळख सातासमुद्रापार जाणार आहे." या स्वामीजींच्या विचाराला, विश्वासाला, दूरदृष्टीला प्रत्येक तरुणाने आपल्या दैवताप्रमाणे मानून, मनात सतत या विचाराची जाण ठेवून वागण्याची आणि स्वतःसाठी घातक त्याचप्रमाणे आपल्या प्रिय समाजासाठी घातक गोष्टींना "नामंजूर!!" असा ठाम इन्कार देऊन प्रगतीकडे वाटचाल करण्याची गरज आहे.
                           "मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची,
                             येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर!!!"
या ओळी या भावनेला अधिक बळ देतील असा वाटतं.