कोणी सांगितलंय, नेहमीच
शब्दातूनच व्यक्त होते भावना?
कोण म्हणतं, नेहमीच
बोलूनच सांगता येतं काही?
थेंब स्पर्श केवळ पुरेसा धरेला
जेव्हा अबोल पावसाची येते सर
मृद-गंधाचा साज धरेला
जेव्हा जुळतो तिचा-त्याचा स्वर
भावस्वर हाच गाभा गीताचा ,
ईश्वराच्या तो अगदी नजीकचा..
छेडल्या जाउनी सुरेल तारा,
नाद व्यापतो मनाचा गाभारा..
नाद असतो तेव्हाच सुरांची वीण घट्ट होते,
कृष्ण्सखी राधा त्या वंशीनादातच नादावून जाते..
कृष्ण आणि बासरीचा नाद यात अंतरच राहत नाही,
अगदी तसाच..कृष्ण आणि राधा यातही फरकच उरत नाही..
सुराला नादाची ओढ आणि शब्दाला गीताची,
नात्याला जवळीक जशी भावनांची..
भावनेची वीण म्हणजेच नात्याचा खरा अविष्कार,
नकळत उमगणारा मनातला हळुवार हुंकार..
शब्दातूनच व्यक्त होते भावना?
कोण म्हणतं, नेहमीच
बोलूनच सांगता येतं काही?
थेंब स्पर्श केवळ पुरेसा धरेला
जेव्हा अबोल पावसाची येते सर
मृद-गंधाचा साज धरेला
जेव्हा जुळतो तिचा-त्याचा स्वर
भावस्वर हाच गाभा गीताचा ,
ईश्वराच्या तो अगदी नजीकचा..
छेडल्या जाउनी सुरेल तारा,
नाद व्यापतो मनाचा गाभारा..
नाद असतो तेव्हाच सुरांची वीण घट्ट होते,
कृष्ण्सखी राधा त्या वंशीनादातच नादावून जाते..
कृष्ण आणि बासरीचा नाद यात अंतरच राहत नाही,
अगदी तसाच..कृष्ण आणि राधा यातही फरकच उरत नाही..
सुराला नादाची ओढ आणि शब्दाला गीताची,
नात्याला जवळीक जशी भावनांची..
भावनेची वीण म्हणजेच नात्याचा खरा अविष्कार,
नकळत उमगणारा मनातला हळुवार हुंकार..
क्या बात है!! श्रावणातल्या पावसाळ्यात सर येऊन गेल्यावर कोवळे ऊन पडावे अन् त्या किरणांत पानांवरचे जलबिंदू चमकावेत तशी तरल झाली आहे कविता...
ReplyDeleteलिहीत राहा...